दुर्योधनाची सर्वात मोठी चूक – श्रीकृष्णाची बुद्धिमत्ता आणि अर्जुनाची भक्ती

Share This

दुर्योधनाची सर्वात मोठी चूक – महाभारतातील कथा

कधी काळी, जगात एक महायुद्ध घडायचं होतं – ज्याने संपूर्ण धर्म, नीती आणि मानवीतेच्या मार्गांची परीक्षा घ्यायची होती. महाभारत म्हणजे अशा साऱ्या घटनांचं अमूल्य दालन. आणि त्या घडामोडींमधील एक अत्यंत महत्वाचा क्षण होता — जेव्हा कृष्णाने दोन्ही बाजूंना निवडीचा अधिकार दिला. युद्धाच्या सावल्या वाढत होत्या. कुरुक्षेत्रातील रणांगणावर दोन्ही बाजूंनी तयार्या चालू होत्या. पांडव आणि कौरव — दोघांनाही माहित होतं की विजय फक्त शस्त्रांनी मिळत नाही, तर चांगल्या संगतीने, चांगल्या निर्णयांनी आणि कृपादृष्टीने मिळतो. या सर्वांमध्ये कृष्ण केंद्रस्थानी होता. तो राजा नव्हता, पण त्याच्याजवळ अत्यंत अनुभवी आणि प्रशिक्षित अशा १०,००० योध्यांची सेना होती. या सेनेचं मूल्य अगणित होतं. म्हणून अर्जुन आणि दुर्योधन — दोघेही श्रीकृष्णाच्या मदतीसाठी गेले.

त्या वेळी फक्त दोनच पक्ष होते. कौरव आणि पांडव. ते शक्य तितका पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते कारण युद्ध लवकरच सुरू होणार होते आणि प्रत्येक सैनिक महत्वाचा होता. त्यांना अधिकाधिक सैन्य जमा करायचे होते कारण प्रश्न अखेर जीवन-मरणाचा होता, ती काही कोणती निवडणूक नव्हती.

कृष्ण हा कोणी राजा नाही, पण त्याच्याकडे 10,000 पेक्षा अधिक प्रशिक्षित सैनिकांची सेना आहे, ज्यांनी अनेक युद्धांमध्ये भाग घेतलेला असतो – एक मौल्यवान संपत्ती. तर कृष्ण दुपारी झोपेचे नाटक करत असतो. तो तसाच आहे – तो झोपेचे नाटक करतो आहे कारण जेंव्हा पुढे काय घडणार आहे हे त्याला आधीच माहिती असते, आणि तरीही त्याला त्या खेळाच्या रंगाचा भंग करायचा नसतो, तेंव्हा तो थोड्याफार प्रमाणात सोंग करणे आवश्यक असते.

दुर्योधन, सर्वात मोठा कौरव तिथे आला, त्याचा खोलीत डोकावून पाहिले आणि त्याला दिसले की कृष्ण झोपलेला आहे. वाट पाहण्याचे ठरवून तो तिथे कृष्णाच्या पायाखाली बसतो. झोपलेल्या कृष्णाच्या चेहेर्‍यावर सौम्य हास्य असते. त्याचे पाय दुर्योधनाच्या दिशेने असतात. दुर्योधन त्याकडे पाहतो आणि त्याला ते आवडत नाही. “हा राजा देखील नाही, हा एक गुराखी आहे. मी एक महान सम्राट आहे. मी याच्या पायांशी का बसलो आहे?”

म्हणून तो सावकाशपणे उठून उभा राहतो आणि त्याच्या डोक्याजवळ येऊन बसतो. नंतर अर्जुन येतो. तो कृष्णाचा भक्त असतो, आणि अगोदर दुर्योधन बसलेला असतो त्याठिकाणी तो जाऊन बसतो. कृष्णाचे पाय त्याच्या दिशेने असतात, तो त्याकडे एक आशीर्वाद म्हणून पाहतो. म्हणून तो तिथेच बसतो.

थोड्या वेळाने कृष्ण डोळे उघडतो, आणि जागे झाल्याचे नाटक करतो. हे पहा, ही एक अडचण आहे. एकदा तुम्ही झोपेचे नाटक केले की तुम्हाला जागे झाल्याचे पण नाटक करावे लागते. एक कृती पुढील अनेक गहन कृतींकडे घेऊन जाते.

कृष्ण म्हणतो, “अरे अर्जुना, तू आला आहेस तर.” अर्जुन म्हणतो, “हो भगवान, मी आलो आहे.” पुढे ते काही बोलायच्या आतच दुर्योधनाने त्याची उपस्थिती जाणवून देण्यासाठी त्याचा घसा खाकरला. कृष्ण म्हणाला, “अरे, दुर्योधना, तु सुद्धा? दोघेही एकाच वेळी – तुम्ही दोघे इथे कशासाठी आला आहात? त्याला सगळी परिस्थिती माहिती होती.

मग दोघेजण म्हणाले की ते युद्धात त्याची मदत मागायला आले आहेत. कृष्ण म्हणाला “तुम्ही दोघे आला आहात आणि तुम्ही दोघेही एकच गोष्ट मागत आहात, त्यामुळे माझे म्हणणे असे आहे. तुमच्या दोघांपैकी एकजण माझे सैन्य घेऊन शकतो, आणि मी दुसर्‍याकडे जाईन. पण मी युद्ध करणार नाही. मी फक्त तुमच्यासोबत येईन. माझे लक्ष अगोदर अर्जुनाकडे गेल्यामुळे, त्याला निवडीची संधी प्रथम मिळेल.”

दुर्योधनाने विरोध केला, “मी इथे आधी आलो आहे!” कृष्ण म्हणतो, “पण मी काय करू शकतो? मी पहिल्यांदा त्याला पहिले आहे.”

मग कृष्ण अर्जुनाला म्हणाला, “तू तुला जे हवं त्याची निवड कर.” अर्जुन म्हणाला, “भगवान, आम्हाला तुम्ही हवे आहात, मला तुमचे सैन्य मिळाले नाही तरी चालेल. आम्हाला केवळ तुम्ही आमच्यासोबत हवे आहात.” कृष्णाने त्याला सूचना दिली, “मी तुझ्यासाठी युद्ध करणार नाही. मी फक्त तुझ्यासोबत येणार आहे.”

तो म्हणाला, “तुम्हाला काहीही करावे लागणार नाही, आम्हाला फक्त तुम्ही आमच्या बाजूने हवे आहात.” मग दुर्योधनाने सुटकेचा निश्वास टाकला – तो अतिशय आनंदी झाला! त्याला माहिती होते की पांडव मूर्ख आहेत, पण 10,000 प्रशिक्षित सैनिकांच्या ऐवजी ते एका माणसाला निवडण्यायेवढे ते येवढे मूर्ख असतील असा विचार त्याने कधीही केला नव्हता.

आणि हा एक माणूस युद्ध देखील करणार नाही. फक्त तुमच्यासोबत येणार आहे, तुमचे सारथ्य करणार आहे. 10,000 प्रशिक्षित सैनिकांच्या ऐवजी एक माणूस, जो युद्ध सुद्धा करणार नाही – किती मूर्खासारखी निवड आहे. पण त्या निवडीनेमुळेच युद्धाच्या निकालावर मोठा फरक पडला.

तात्पर्य

या कथेतून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा धडा मिळतो — शक्ती केवळ सैन्यात, संपत्तीत किंवा संख्येत नसते. खरी शक्ती असते विश्वास, भक्ती, आणि योग्य मार्गदर्शनावर असणाऱ्या श्रद्धेमध्ये. अर्जुनाने सैन्य न निवडता श्रीकृष्णाला निवडले, कारण त्याला माहीत होते की परमेश्वराचे सहचर्य म्हणजेच खरे विजयाचे कारण. दुसरीकडे दुर्योधनाने अहंकाराने युद्धाच्या ताकदीचा विचार केला, परंतु त्यात आत्मबल, धर्म आणि मार्गदर्शकाचा अभाव होता. म्हणूनच जीवनात कोणत्या गोष्टींची निवड करतो यावर आपले भविष्य अवलंबून असते — हेच या प्रसंगाचे खरे सार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा